हे पुस्तक नवीन पिढीतील पालकांनी, शिक्षकांनी आणि एकुणच मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकाने नक्की वाचावे!
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जवळ जवळ दहा वर्षे डॉ. माँटेसरी यांचे वास्तव्य भारतात होते. त्यांचे काम त्याआधीच भारतात पोहचले होते, पण त्यांच्या या वास्तव्यात बालशिक्षणाच्या या नवीन प्रणालीची पाळेमुळे चांगलीच रुजली. शिक्षण हे शांततेसाठीचे साधन आहे, असे त्या मानत. अशा विचारांमुळे त्यांची भारताशीसुद्दा नाळ जोडली गेली. हे पुस्तक पालक व शिक्षक यांच्यासाठी खूप मार्गदर्शक आहे.......